423 ग्रामपंचायतींसाठी बिगुल; 12 जूनला आरक्षण जाहीर, गावपातळीवर राजकीय हालचालींना वेग

Pune Update ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या गोकुळ दूध संघाचे राजकारण गेल्या दीड महिन्यांपासून तापले असताना आता गाव गाड्याच्या राजकारणाचा पारा चढणार आहे.

कारण मुदत संपलेल्या कोल्हापूर जिल्ह्यातील 433 ग्रामपंचायत निवडणुकीचा धुरळा उडणार आहे.

बुधवारी राज्य निवडणूक आयोगाकडून वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. येणाऱ्या 12 जूनला विशेष ग्रामसभेमध्ये आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. त्यानंतर निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होणार आहे. त्यामुळे सप्टेंबर महिन्यानंतर गोकुळची निवडणूक होण्याचा अंदाज आहे. त्याचबरोबर गाव गाड्यातील पुढारी ठरवण्यासाठी जिल्ह्यात राजकारण पेटणार आहे.