Sharad Pawar on Devendra Fadnavis: देवाभाऊ, शिवाजी महाराजांचं नाव घेता आणि बळीराजाकडे ढुंकून पाहत नाही, शरद पवारांचा हल्लाबोल

महाराष्ट्राच्या काळ्या आईशी इमान राखण्यासाठी आपण आलो आहे. शेतकरी अस्वस्थ आहे. बीडसारख्या जिल्ह्यात अनेकवेळा दुष्काळ असतो तिथं अतिवृष्टी झाली आहे.

देवाभाऊ शिवाजी महाराज यांच्या काळात दुष्काळ पडला होता, त्यावेळी त्यांनी सोन्याची नाणी दिली आणि सोन्याचा नांगर शेतकऱ्यांना घेता आला ते शेती करू शकले. आज शिवाजी महाराज यांचं नाव घेत आहात आणि बळीराजाकडे ढुंकून पाहत नाही. आपल्याला बघ्याची भूमिका घेता येणार नाही. आगामी ठराविक दिवसांत तुम्ही मदत केली नाही तर नाशिकचा हा मोर्चास भविष्यात आणखी उग्र रूप घेईल. देवाभाऊ देशाच्या आजूबाजूला बघा काय घडत आहे. नेपाळमधे सरकार गेलं आणि भगिनीच्या हातात राज्य आलं आहे आणखी काही मी बोलणार नाही.

10 दिवसांत आम्ही 70 हजार कोटींचं कर्ज माफ केलं

त्यांनी पुढे सांगितले की, ग्रामीण भगत 2 हजारपेक्षा जास्त शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. मराठवाड्यातील संख्या जास्त आहे. शेतकरी जीव का देतो कारण त्याच्या संकट काळात त्याच्या पाठीशी राहत नाही. त्यामुळे आत्महत्या वाढायला लागल्या आहेत. कृषीमंत्री असताना एकेदिवशी माझ्या वाचनात आलं की, यवतमाळ जिल्ह्यात शेतकऱ्याने आत्महत्या केली आहे. दुसऱ्या दिवशी मनमोहन सिंग याना विनंती केली शेतकरी जीव देतोय त्यासाठी आपल्याला दिल्लीत बसून विषय सुटणार नाही, त्यासाठी त्या ठिकाणी जायला हवं. दुसऱ्या दिवशी आम्ही यवतमाळला गेलो. तिथं जाऊन त्यांच्या कुटुंबाची भेट घेतली. शेतकऱ्याची बायको रडली. मी तिला विचारलं मालकाने जीव का दिला तिने सांगितलं कर्ज वाढलं होतं. सोसायटी देता आलं नाही. त्यानंतर सावकाराच कर्ज काढलं ते देखील थकलं होतं. त्यानंतर सावकार घरी आला आणि आमच्या अब्रूचा पंचनामा केला हे त्यांना सहन झालं नाही. त्यांनी आत्महत्या केली. त्यानंतर 10 दिवसांत आम्ही 70 हजार कोटी कर्ज देशात माफ केल. नाशिकचा कांदा घरात जातो, त्याचे दोन पैसे शेतकऱ्याला मिळावेत ही त्याची इच्छा असते. ज्यामुळे मुलीचं लग्न, मुलांचं शिक्षण करता येईल. मात्र, केंद्र सरकारने निर्यात बंदी केली, त्यामुळे शेतकरी अडचणीत आला आहे. या सरकारला शेतकऱ्यांच दुख समजत नाही, असे ते म्हणाले.