रोहितदादांनी व विकास लवांडे यांनी स्वतःच्या पक्षाकडे पहावे – शशिकांत तरंगे यांची टीका

पुणे प्रतिनिधी (Pune News NCP) राष्ट्रवादीच्या खासदार सुनेत्राताई पवार ( Sunetra Pawar) यांनी दिल्लीत भाजपा खासदार कंगना राणौत (Kangana Ranaut) यांच्या निवासस्थानी राष्ट्र सेविका समितीच्या बैठकीला उपस्थिती लावल्यावरून चांगलंच राजकारण तापल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.

सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीवरुन त्यांच्यावर टीका करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे विकास लवांडे यांना राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेश प्रवक्ते शशिकांत तरंगे यांनी चांगले सुनावले आहे.

विकास लवांडे यांनी स्वतःच्या पक्षात लक्ष देऊन पक्ष वाढीसाठी प्रयत्न करावेत आमच्या पक्षात काय चालले आहे त्याकडे लक्ष कमी द्यावे असा सणसणीत टोला प्रदेश प्रवक्ते शशिकांत तरंगे यांनी लवांडे यांना लगावला यावेळी ते म्हणाले की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ही कधीच शाहू फुले आंबेडकर यांचे विचार सोडू शकत नाही पार्टीतील प्रत्येक सदस्यांमध्ये शाहू फुले आंबेडकर यांचे विचार घेऊन आम्ही काम करतो.

उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची कामाची शैली पाहून

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार 18 ते 19 तास काम करून  समाज हिताचे निर्णय घेत असतात, त्यामुळेच विरोधी पक्षातील नेत्यांना काही कामच ते शिल्लक ठेवत नाहीत त्यामुळे जाणीवपूर्वक ते अशा टीका नेहमीच करतात विकासाच्या मुद्द्यावर एक साधे निवेदन ते कोणाला देत नाहीत मात्र जाणीवपूर्वक काम करणारे व्यक्तिवर चिखल फेक करण्याचे काम विकास लवांडे व रोहित पवारांसारखे लोक नेहमीच करत असतात त्यामुळे यांचे सल्ले आम्हाला देण्याची गरज नाही असा देखील टोला तरंगे यांनी लगावला.

सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीवरुन त्यांच्यावर टीका करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे विकास लवांडे यांना राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेश प्रवक्ते शशिकांत तरंगे यांनी चांगले सुनावले आहे.

विकास लवांडे यांनी स्वतःच्या पक्षात लक्ष देऊन पक्ष वाढीसाठी प्रयत्न करावेत आमच्या पक्षात काय चालले आहे त्याकडे लक्ष कमी द्यावे असा सणसणीत टोला प्रदेश प्रवक्ते शशिकांत तरंगे यांनी लवांडे यांना लगावला यावेळी ते म्हणाले की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ही कधीच शाहू फुले आंबेडकर यांचे विचार सोडू शकत नाही पार्टीतील प्रत्येक सदस्यांमध्ये शाहू फुले आंबेडकर यांचे विचार घेऊन आम्ही काम करतो.

उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची कामाची शैली पाहून

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार 18 ते 19 तास काम करून  समाज हिताचे निर्णय घेत असतात, त्यामुळेच विरोधी पक्षातील नेत्यांना काही कामच ते शिल्लक ठेवत नाहीत त्यामुळे जाणीवपूर्वक ते अशा टीका नेहमीच करतात विकासाच्या मुद्द्यावर एक साधे निवेदन ते कोणाला देत नाहीत मात्र जाणीवपूर्वक काम करणारे व्यक्तिवर चिखल फेक करण्याचे काम विकास लवांडे व रोहित पवारांसारखे लोक नेहमीच करत असतात त्यामुळे यांचे सल्ले आम्हाला देण्याची गरज नाही असा देखील टोला तरंगे यांनी लगावला.