चिंचवड प्रतिनिधी (Pimpri Chinchwad news पिंपरी-चिंचवड शहरातील दापोडी ते निगडी दरम्यानच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातील विकासकामांमध्ये सुरू असलेल्या मोठ्या प्रमाणावरच्या दिरंगाई, अनियमितता आणि प्रशासकीय निष्क्रियतेमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. या गंभीर प्रश्नावर भाजप आमदार अमित गोरखे यांनी आज (८ जुलै, २०२५) विधान परिषदेत जोरदार आवाज उठवला. कामांची निकृष्ट गुणवत्ता आणि गंभीर वाहतूक कोंडीचा मुद्दा त्यांनी सभागृहात मांडला.नागरिकांची दैनंदिन परवड:आमदार गोरखे यांनी विधान परिषदेत सांगितले की, “या विकासकामांच्या दिरंगाईमुळे नागरिकांना दररोज २-३ तास वाहतूक कोंडीत अडकावे लागते, कामावर जाणाऱ्यांचा मौल्यवान वेळ वाया जातो आणि संपूर्ण परिसरात अस्वस्थता पसरली आहे.” विशेषतः मोरवाडी चौक ते चिंचवड चौक दरम्यान रस्ते अरुंद आणि अर्धवट अवस्थेत असल्याने गंभीर वाहतूक समस्या निर्माण झाली आहे, असे त्यांनी निदर्शनास आणून दिले.कामाचा दर्जा निकृष्ट, सुरक्षेचे नियम पायदळी:नागरिकांच्या तक्रारीनुसार, या कामाची गुणवत्ता अत्यंत निकृष्ट असून, सुरक्षेच्या प्राथमिक नियमांचेही पालन केले जात नाही. कार्यरत असलेल्या ठेकेदारांकडून नियमांचे सर्रास उल्लंघन होत असतानाही, महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांकडून कोणतीही ठोस कारवाई केली जात नसल्याचे निदर्शनास आले आहे.
ताज्या बातम्यांसाठी व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
https://chat.whatsapp.com/CpAIGQtMUxgHIkphDc5ULj
नवनवीन घडामोडी व आपल्या भागातील बातम्या व व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा
https://whatsapp.com/channel/0029Vb9yW9YKmCPX7kNeWt0A
तांत्रिक ऑडिट आणि कठोर कारवाईची मागणी:आमदार गोरखे यांनी सभागृहात स्पष्ट केले की, “महानगरपालिका अधिकारी आणि ठेकेदारांमध्ये लागेबांधे असल्याचा नागरिकांचा थेट आरोप आहे. यामुळे कामात पारदर्शकता आणि जबाबदारीचा अभाव दिसून येतो.” या पार्श्वभूमीवर, आमदार अमित गोरखे यांनी संबंधित कामाची तातडीने उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी आणि तांत्रिक ऑडिट करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी विधान परिषदेत केली.आंदोलनाचा इशारा आणि आग्रही भूमिका:गोरखे यांनी प्रशासनाला स्पष्ट शब्दांत सांगितले की, “नागरिकांच्या सहनशीलतेचा अंत झाला असून, प्रशासनाने यापुढे दुर्लक्ष केल्यास आंदोलनात्मक मार्ग पत्करावा लागेल.” प्रशासनाने तातडीने पुढील कामासाठी जागा ताब्यात घ्यावी, रस्ते पूर्णपणे रुंदीकरण करून वाहतूक कोंडीचा प्रश्न निकाली काढावा, अशी आग्रही भूमिका आमदार गोरखे यांनी सभागृहात मांडली.